pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

 जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला महसूल विभागाच्या आढावा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.26

 जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज महसूल विभागातील सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत उप जिल्हाधिकारी, सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी सदरील बैठकीत सर्व उप विभागीय अधिकारी यांनी दरमहा 2 तर तहसीलदार यांनी दरमहा 4 क्षेत्रभेटी करण्याच्या सूचना देवून, ग्रामपातळीवरील जनतेशी सातत्याने सुसंवाद ठेवण्यास सांगितले. तसेच  कार्यालयीन कामकाज करतांना तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा. मंडळ अधिकारी, तलाठी, तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांचे सक्षमीकरण करुन  ई-ऑफिस प्रशिक्षणाचे आयोजन करावे. तसेच माहे नोव्हेंबर 2025 पर्यंत नागरिकांच्या प्रलंबित सर्व तक्रारीचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

तसेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत दि. 17 सप्टेंबर, 2025 ते 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत मिशन मोडवर कामकाज करुन, यात पाणंद रस्ते गाव नकाशावर घेणे, सर्वांसाठी घरे या अभियानांतर्गत पट्टेवाटप करण्याचा कार्यक्रम घेण्याबाबात सांगितले. नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या सेवा विषयक माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात.  मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत असून, या कार्यक्रमातील सर्व सेवा विषयक बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे