pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

नुक्क़ड नाटकाद्वारे युवकांनी दिला पाणी बचतीचा संदेश

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 30

नेहरु युवा केंद्र, जालना व युवा बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त़ विद्यमाने जलशक्ती मंत्रालयाच्या पुढाकाराने कॅच द रेन 3.0 कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये बेलोरा, जानेफळ, बोरगाव फोदाट, सुभानपुर, शेलोद येथे कलाकारांनी पथनाट्य सादरीकरण यामध्ये नुक्क़ड नाटकद्वारे युवकांनी पाणी बचतीचा संदेश दिला.
संघ प्रमुख ईश्वर कृष्णा मोरे, कलाकार रविराज रंगनाथ कोल्हे, आकाश गणेश तांगडे, संदीप कृष्णा मोरे, भाऊसाहेब फदाट, विनोद समाधान तांगडे यांनी नुक्क़ड नाटकाद्वारे पृथ्वीवरील प्रत्येकाच्या जीवनासाठी पाणी महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपण सर्वांनी जलसंधारणाची विशेष काळजी घेतली पाहिजे. आवश्यक आपल्या सर्वांना तुमच्या दैनंदिनीसह विविध कामांमध्ये कमीत कमी पाणी वापरण्याचा प्रयत्न करा व पावसाचे पाणी वाया जाते, ते वाचवले पाहिजे आणि ते साठवले पाहिजे जेणे करून ते पुन्हा वापरता येईल संदेश गावोगावी देण्यात आले. यावेळी योगेश गाढे, संजय पंडीत, शरद बराटे, जयपाल राठोड, लिलाबाई जाधव, मनिषा वर्धमान वास्कर, पंचफुलाबाई बोरडे, संजय तायडे, लालसिंग राजपूत इत्यादी उपस्थित होते. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे