विद्यार्थ्यांच्या उत्तम चरित्र निर्माणासाठी मूल्यवर्धन प्रशिक्षण — प्राचार्य सान्वी देशमुख

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.4
विद्या र्थ्यांमध्ये वाढता मूल्यांचा ऱ्हास, आक्रमकता, चिडचिडेपणा, मोबाईलचे ॲडिक्शन हे पालकांसोबत शिक्षकांसाठी ही चिंतेची बाब आहे म्हणून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांचे वर्धन, संगोपन करण्यासाठी व विद्यार्थ्यांचे उत्तम चारित्र्य निर्माण करण्यासाठी राज्यभर मूल्यवर्धन प्रशिक्षण देण्यात येत आहे.
मुथा फाऊंडेशन व महाराष्ट्र शासनाचा पुढाकाराने हे प्रशिक्षण संपन्न होत आहे. सर्व शिक्षकांनी या प्रशिक्षणाद्वारे आत्मसात केलेले मूल्य विद्यार्थ्यांमध्ये बिंबवावीत.
जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मूल्यवर्धन प्रशिक्षण सुरू आहे. मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय जालना येथे आयोजित प्रशिक्षणाला भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ वैशाली जहागीरदार, डॉ प्रमोद कुमावत, प्रशिक्षण प्रमुख योगेश्वर जाधव, डॉ करुणा हिवाळे, प्रफुल्ल राजे,छगन जाधव आदी प्रशिक्षक व शिक्षक वृंद उपस्थित होते.


